नागपूर : भारतीय जनता पक्षाला जनादेश मिळूनही सत्ता स्थापनेत आलेल्या अपयशाची कारण मिमांसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय समितीकडून केली जाणार आहे. या पुर्वीप्रमाणे शिवसेनेशी जुळवून घ्यायला कोणती कारणे कारणीभूत ठरली याचा शोध घेण्यात येणार आहे.
शिवसेना समान विचारधारा असूनही भाजपासोबत न जाता शिवसेनेने अन्य पक्षीयांसोबत सरकार स्थापन का केले? भाजपापासून फारकत घेण्याचा निर्णय शिवसेनेने निकाला आधी घेतला होता का? शिवसेनेशी उर्मट वर्तणूक ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला का? का राज्यातील या पक्षाची सत्तेची महत्वाकांक्षा या आड आली? असे अनेक प्रश्न यानिमित्त तपासले जाणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कृष्ण गोपाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात येईल. निवडणुकीच्या सुरवातीपासून ते सरकार स्थापन होईपर्यंत साऱ्या घटनांचा आढावा ही समिती घेईल.
नागपूरमधील संघाचे ज्येष्ठ नेते दिलीप देवधर आयएएनएस या वृत्तसंस्थेला म्हणाले, या सर्व प्रकाराची संघाची समन्वय समिती सखोल चौकशी करेल. त्यानंतर नकिच्या भजिकच्या भविष्यात भाजपा आणि संघ नेत्यांच्यात याबाबत बैठक होऊ शकेल.
सुमारे 15 आमदारांनी हा मुद्दा संघापुढे उपस्थित केला आहे. भाजपाच्या कारभारात हस्तक्षेप करणे संघाला योग्य वाटत नाही. सर्वसाधारणपणे जोपर्यंत निकाल समाधानकारक मिळतात तोर्पंत संघ भाजपाच्या कारभारात हस्तक्षेप करतही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.