श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र नाईक संदीप सावंत (25) शाहिद झाले आहेत. ते सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवासी आहेत. जवानांकडून दहशवाद्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
Two Indian Army soldiers have lost their lives during a cordon & search operation in Nowshera sector(J&K). The operation is still in progress. Further details awaited. pic.twitter.com/yIk6GMdZzD
— ANI (@ANI) January 1, 2020
दीड वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगी आई, वडील, चुलते, चुलत भाऊ, बहिण असा परिवार आहे. नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. त्यात या दोघांना वीरमरण आले.
पहाटे या परिसरात काही दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर जवानांकडून या ठिकाणी शोधमोहमी राबवल्या जात होती, दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले.