मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत मशिदीवरील भोंग्यांबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आता राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे उद्या जाहीर सभा होणार असून त्याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष आहे.त्यातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाबरी पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यावर आता संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांची ‘मेमरी इरेज’ झाल्याची टीका त्यांनी केली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज साहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज्यभर दौरे करून शिवसेना वाढवण्याचे काम करत होते. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना विनंती केली म्हणून उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले हे उद्धव ठाकरे यांनी विसरू नये असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. आता संदीप देशपांडे यांच्या टीकेला शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे. ”मुख्यमंत्र्यांची मेमरी इरेज झाली आहे, म्हणून मुख्यमंत्री असले प्रश्न विचारतात. जेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज साहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत राज्यभर दौरे करत होते, शिवसेना वाढवण्याचे काम करत होते. राज ठाकरे यांनी विनंती केल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केले हे उद्धव ठाकरे यांनी विसरू नये. हे नव पुरोगामी झाले असून, यांना राज ठाकरे यांच्या सभेनंतर आज आठवण होते की आपण हिंदू आहोत”. अशी जोरदार टीका संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.