नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा करोनाने जोर पकडल्याचे दिसत आहे. झपाट्याने वाढणारी करोनाची प्रकरणे प्रशासन आणि लोकांची चिंता वाढवत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 3 हजार 688 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, जी कालच्या तुलनेत जास्त आहे. त्याच वेळी, या कालावधीत करोनामुळे 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. या नवीन प्रकरणांनंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 18 हजार 684 झाली आहे.
COVID19 | 3,688 new cases in India today; Active caseload rises to 18,684 pic.twitter.com/9NB1foJONC
— ANI (@ANI) April 30, 2022
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील एकूण 4 कोटी 30 लाख 75 हजार 862 लोकांना करोना झाला आहे. यासोबतच देशभरातील मृतांचा आकडा 5 लाख 23 हजार 803 वर पोहोचला आहे. देशभरात पुन्हा एकदा करोनाने तोंडवर काढले आहे त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.