मुंबई – मनसे नेते संदीप देशपांडे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मुंबईचे प्रश्न असोत वा सध्याच्या राजकारण देशपांडे सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत असतात. नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनासाठी दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांसह भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीबाबत संदीप देशपांडे यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं.
संदीप देशपांडे यांनी केलेल्या नव्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. काँग्रेस ने कधीच दावा केला नाही की महात्मा गांधी त्यांचेच, हिंदू महासभा कधीच म्हणाले नाही की सावरकर आमचेच, बाबासाहेब आंबेडकर तर देशाचेच मग तुमच्या मनात हा पझेसिव्ह पणा का आहे ? हा पझेसिव्ह नेस आहे की असुरक्षितता ? अशा आशयाचे ट्विट देशपांडे यांनी केलं आहे.
काँग्रेस ने कधीच दावा केला नाही की महात्मा गांधी त्यांचेच, हिंदू महासभा कधीच म्हणाले नाही की सावरकर आमचेच, बाबासाहेब आंबेडकर तर देशाचेच मग तुमच्या मनात हा पझेसिव्ह पणा का आहे?हा पझेसिव्ह नेस आहे की असुरक्षितता?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 27, 2022
यापूर्वी देखील देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीबाबत भाष्य करत नाव न घेता ट्विट केलं होत ज्यात ते म्हणतात, अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची अडीच वर्षे “simpathy” असं ट्विट करत ‘मुलाखत’ हा हॅशटॅग वापरला होता.
अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची अडीच वर्षे “simpathy”#मुलाखत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2022
|| ‘साहेब’ जैसा जैसा बोले
हा तैसा तैसा चाले
म्हणून यांचे आस्तित्व बुडाले || pic.twitter.com/0T2906UAsS— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2022