Salman-Arijit – बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) आणि प्रसिद्ध गायक अरिजित सिंग (arijit singh) यांच्यातील अनेक वर्षांपासून सुरु असलेलं भांडण संपले असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अरिजित सिंग समलान खानच्या घरी पोहोचला होता.
आता सलमान खानने स्वतःला अरिजित सिंगने टायगर-3 (tiger-3) मध्ये पहिल्यांदाच त्याच्यासाठी गाणे गायले असल्याचे सांगितलं आहे. सलमान खानने टायगर-3 च्या पहिल्या गाण्याचा फर्स्ट लूकही सोशल मीडियावर रिलीज केला आहे.
अरिजीतने सलमानसाठी गायलेले गाणे 23 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. गाण्याची घोषणा करताना सलमान खानने ट्विट केले की, “पहिल्या गाण्याची पहिली झलक. परमेश्वराचे नाव घ्या.! अरे हो, हे माझ्यासाठी अरिजित सिंगचे पहिले गाणे आहे. हे गाणे 23 ऑक्टोबरला येईल.’ असं तो म्हणाला.
सुमारे नऊ वर्षांपूर्वी एका अवॉर्ड शोदरम्यान घडलेल्या एका घटनेनंतर अरिजित सिंग आणि सलमान खान यांच्यातील संबंध बिघडले होते. यावेळी अरिजित सिंगने पुरस्कार जिंकला होता. जेव्हा तो पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर पोहोचला तेव्हा सलमान गमतीने म्हणाला, ‘तो झोपला होता…’
यावर अरिजीत म्हणाला होता, “तुम्ही माझी झोप उडवली. तेव्हा सलमान म्हणाला होता की, तुमची चूक नाही तर.. तुम ही हो गाणे ऐकून लोक झोपी जातात..’ असं किस्सा यावेळी घडला होता.
Pehle gaane ki pehli jhalak. #LekePrabhuKaNaam! Oh haan, yeh hai Arijit Singh ka pehla gaana mere liye. Song out on 23rd Oct. #Tiger3 coming to theatres this Diwali, 12th Nov.
Releasing in Hindi, Tamil & Telugu.#KatrinaKaif @emraanhashmi #ManeeshSharma @yrf @ipritamofficial… pic.twitter.com/gFBcJQX5tU
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 19, 2023
दरम्यान, या घटनेनंतर सलमान खानने त्याच्या बजरंगी भाईजान, किक आणि सुलतान या चित्रपटातून अरिजितचे गाणे काढून टाकले होते. त्यानंतर अरिजित सिंगने सलमान खानची माफीही मागितली.
अरिजितने त्या रात्री अवॉर्ड शोमध्ये सलमानचा अपमान केला नसल्याचे देखील सांगितले होते. मात्र, आता अनेक वर्षांनंतर दोघांमधील हे भांडण कुठे तरी थांबले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, सलमान खानचा टायगर-3 पुढील महिन्यात 12 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलर खूपच दमदार आहे. टायगर-3 मध्ये सलमानसोबत इमरान हाश्मी आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.