सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी नुकतेच केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. सदाभाऊ खोत एका कार्यक्रमात बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
ते म्हणाले,’देवेंद्र फडणवीस हे प्रस्थापितांची बाजू घेत नाहीत. त्या माणसाकडे साखर कारखाना, दूध संघ, बॅंका असं काही नाही. आमची एकच अपेक्षा आहे. गड्या तुझं काही नाही, फक्त आता या प्रस्थापितांना सुरुंग लाव. यांना सुरंग लावला की, फडणवीस हा माणूस 80 वर्ष राज्य करेल, मात्र हे गडी उध्वस्त केले पाहिजेत, असं म्हणत नाव न घेता खोत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
पण हे गडी एवढे हुशार की, पहाटेचे जाऊन भेटतात. तेव्हा ते एवढे गोड बोलतात की ते आपले सासरे बुवा झाले की काय असे वाटते. मी फडणवीसांना सांगीन की, हे कडू सासरे आहेत. यांच्यापासून सावध राहा… नाहीतर गुगल्या पडल्याच म्हणून समजा, असं म्हणत खोत यांनी फडणवीसांना सल्ला दिलाय. तर शरद पवारांवर टीका केली आहे.