नवी दिल्ली – मोदींच्या सरकार मध्ये विदेश व्यवहार मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आलेले एस जयशंकर हे पहिलेच परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. चीन आणि अमेरिका यांच्याशी असलेल्या भारताच्या संबंधांचा त्यांना विशेष अभ्यास आहे. त्यामुळे त्यांची परराष्ट्र मंत्री म्हणून होणाऱ्या कारकिर्दी विषयी विशेष औत्स्युक्य आहे. सोळा महिन्यापुर्वीच ते विदेश सचिव पदावरून निवृत्त झाले होते. 64 वर्षीैय जयशंकर यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागणार आहे.
जयशंकर हे के सुब्रमण्यम यांचे चिरंजीव आहेत. सुब्रमण्यम यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात युपीए सरकारच्या काळात झालेल्या ऐतिहासिक अणु कराराच्या प्रक्रियेत मोठे योगदान दिले होते.
जयशंकर यांची भारताच्या विदेश सचिव पदावर जानेवारी 2015 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्या आधी अमेरिका आणि चीन मध्ये त्यांनी भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. 1977 च्या आयएफएस बॅचचे अधिकारी असलेले जयशंकर यांनी या आधी लडाख आणि डोकलाम पेच प्रसंगात महत्वाची कामगीरी नोंदवली आहे. जयशंकर हे परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाल्यानंतर टाटा उद्योग समुहाने त्यांची वैश्विक कार्पोरेट अफेअर्स मध्ये अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. ते स्वता दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.