कोल्हापूर – कोरोना प्रतिबंध लसीची निर्यात तात्काळ थांबवा अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलीय. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, एवढे जीव गेल्यावर केंद्र सरकारला जाग आली आणि रेमडिसिव्हीर निर्यात बंदी घातली. रेमडिसिव्हीर आणि लसीचा कंट्रोल मोदींच्या कडे आहे. मोदींना नोबेल पारितोषिक द्यावे लागेल अशी खोचक टीका ही त्यांनी केलीय. दरम्यान देशाच्या प्रत्येक नागरिकाला लस देणे गरजेचे असून कोरोणाचा डबल रेट सुरू झाला आहे. त्यामुळं सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. असंही ते म्हणालेत.