इच्छाशक्ती असेल तर बरेच काही साध्य करता येऊ शकते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे देशातील खेळणी उद्योग. भारत 20 हजार कोटी मूल्यांच्या खेळण्या एकट्या चीनकडून आयात करत होता. आता सरकारचे आवाहन आणि सकारात्मक धोरणांचा परिणाम म्हणजे देशात खेळणी उद्योगाने वेग धरला आहे. या स्थितीत वेगाने बदल होण्याचा चांगला परिणाम म्हणजे भारतात खेळणी उद्योग बहरत आहे.
देशांतर्गत बाजारात स्वदेशी खेळण्यांना मागणी वाढली आहे, तर परदेशातील बाजारपेठांतदेखील भारतीय खेळण्यांची मागणी वाढली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे खेळणी उद्योगाला दिलेले प्रोत्साहन आणि धोरण हेच आहे. यात शंका घेण्याचे कारण नाही. आयात शुल्क वाढवत सरकार हे “प्रॉडक्शन लिंक इन्सेटिव्ह स्किम’ लागू करून उद्योगाच्या विकासातील भागीदार बनला. आज 12 टक्के विकास दरासह खेळणी उद्योग वाटचाल करत आहे आणि हा चक्रवाढ विकास दर आहे. त्यामुळे भारतीय खेळणी उद्योगासाठी हा एक शुभसंकेत आहे.
वास्तविक खेळणी उद्योगांवर चीनची एकाधिकारशाही राहिली आहे. सुमारे 80 टक्के बाजार चीनकडे राहिलेला आहे. अशा वेळी चीनच्या खेळणी उद्योगाला आव्हान देणे हे एक मोठे जिकिरीचे काम होते. परंतु भारत सरकारच्या एका आवाहनाने चित्र बदलून गेले. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून देशात खेळणी उद्योगाला गती आली आहे. एकेकाळी भारत चीनकडून वीस हजार कोटींच्या खेळण्या आयात करत होता. आज स्थिती अशी की भारताचा खेळण्यांचा देशांतर्गत बाजार हा 124.73 अब्ज रुपये झाला आहे. भारताकडून खेळणी निर्यातीतदेखील उल्लेखनीय वाढ झाली आहे. 2018-19 मध्ये 16.81 कोटींची खेळणी निर्यात केल्या जात होत्या. 2022-23 मध्ये त्यात वाढ होऊन 27.08 अब्ज डॉलर झाला आहे. असे म्हटले जात आहे की, 2028 पर्यंत भारत खेळणी उद्योगात 249.47 अब्ज रुपयांची उलाढाल करेल. यामागचे कारण म्हणजे भारतीय खेळण्यांची लोकप्रियता वाढविण्यासाठी तयार केलेले वातावरण पाहता मुलांची पहिली पसंती भारतीय बनावटीच्या खेळण्याच ठरत आहेत.
खेळणी उद्योगात आज 4 हजारापेक्षा अधिक “एमएसएमई’ आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमएसएमई उद्योग हे देशासाठी ग्रोथ इंजिन असते. एमएसएमई उद्योगातून रोजगार अधिक निर्माण होण्याची शक्यता राहते. त्याचवेळी स्थानिक पातळीवर रोजगारदेखील उपलब्ध होतो. मोठ्या उद्योगात एका मर्यादेपर्यंत रोजगारांची संधी मिळत राहते. कारण तेथे तंत्रज्ञानाचा अधिक वापर होतो. दुसरे म्हणजे एमएसएमई उद्योगात रोजगारांच्या अधिक संधी असल्याने आर्थिक व्यवस्थेला नवीन दिशा मिळते.
स्थानिक पातळीपासून निर्यातीपर्यंत संधी सहजपणे उपलब्ध होतात. खेळणी उद्योगाच्या इतिहासाचा विचार केला तर इसनपूर्व 2600 मध्ये सुमेरियन कालखंडातील अवशेषाचे आकलन केले तर मनुष्य आणि प्राण्यांच्या आकाराचे अवशेष आढळून येतात. असे म्हटले जाते की तत्कालीन काळातील या खेळण्या आहेत. इसनपूर्व 500 मध्ये ग्रीक राजवटीतील अवशेषांचा अभ्यास केला तर खेळण्याचे अवशेषदेखील सापडले आहेत. आपल्या देशाचा विचार केला तर रामायण, महाभारत आणि पौराणिक कथांतदेखील खेळण्यांची चर्चा झाल्याचे सांगितले जाते. आपल्याकडे माती, धातू, टेरिकॉट, कपडे, लाकडू, शिंग, मोती आदींपासून खेळण्या तयार केल्या जात होत्या.
काळानुसार खेळण्यांचे स्वरूप बदलत गेले आणि मागणीही. एक काळ होता आणि आजही बार्बी बाहुलीला सर्वाधिक मागणी आहे. क्यूबिकची मागणीदेखील अधिक पहावयास मिळते. चेंडू, बंदूक, जहाज, मोटार, ट्रेन, डमरू, बाजा, शिटी यांसारख्या अनेक खेळण्यांपासून ते ऑटोमेटिक, किल्लीने चालणाऱ्या बाहुल्या आणि आतातर सेल आणि सोलरवर चालणाऱ्या खेळण्या पहावयास मिळत आहेत. प्रत्यक्षात खेळण्या या लहान मुलांचे मनोरंजन करण्यासाठी असतात. एवढेच नाही तर त्यांचे ज्ञान वाढविण्याचे कामदेखील करतात. मुलांच्या मानसिक विकासात खेळण्यांचे योगदान मोठे असते. खेळण्यातून शिकण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. म्हणून खेळण्या या मुलांचा मानसिक, बौद्धिक विकासाचे प्रमुख माध्यम राहत आहेत.
प्रत्यक्षात सरकारने खेळण्यांवरचे आयात शुल्क 20 टक्क्यांवरून 70 टक्के केल्याने कच्चा माल सहज उपलब्ध झाल्याने, ईज ऑफ डुईंग बिझनेसुनार सहजपणे उद्योग उभारले गेल्याने तसेच पीएलआय म्हणजेच प्रॉडक्शन लिंक इन्सेटिव्हमुळे उद्योगांना चालना मिळाली आहे. त्याचबरोबर सरकारकडून निर्यातीत सुलभता आणली गेली आणि सर्वसामान्य उद्योगांना परदेशातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात सहकार्य केले गेले. देशातील हस्तशिल्प निर्यात संवर्धन परिषेकडूनही गरजेनुसार मदत झाली. राज्य सरकारदेखील पुढे आले आहे अणि या कारणांमुळे खूपच कमी काळात देशाच्या खेळणी उद्योगाने देश-विदेशात आपली ओळख प्रस्थापित केली. शेवटी एक गोष्ट म्हणजे परदेशातील गुणवत्तापूर्ण खेळण्या पाहता आपल्याला नावीण्यपूर्ण खेळण्यांचा विकास करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन द्यावे लागेल.
– विधिषा देशपांडे