मुंबई – राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे कायदेशीर लढा देणार असून त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगोविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे राज्यसभा निवडणुकीत मत रद्द केले. त्यानंतर सुहास कांदे यांनी आज उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मत बाद केल्यानंतर आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केला नाही. तसेच चुकीच्या पद्धतीने मत केले बाद निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर तसेच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याची मागणी भाजपाने केली होती. तर महाविकास आघाडीने भाजपचे सुधीर मुनगंटीवार तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप नोंदवला होता. मात्र निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांची मत ग्राह्य धरत सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले होते.