नारायणगाव येथील सभेत उद्धव ठाकरे यांची माहिती
नारायणगाव- आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याची माहिती शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नारायणगाव येथे दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवजन्म भूमीची चमत्कारिक माती अयोध्येला घेऊन गेल्याने श्रीराम मंदिराचा प्रश्न येत्या महिन्यात निकाली लागणार असल्याचे सांगितले. अजित पवार आम्हाला विचारतात तुम्ही पाच वर्षांत काय केले? पाच वर्षांत रिकामी झालेली धरणे तुम्ही भरतात का? हे आम्ही पाहत होतो अशी मिश्किल टिप्पणी करताना कॉंग्रेस पक्ष कुठे गेला सापडत नाही तर राष्ट्रवादी रडत बसले असल्याची टीका त्यांनी केले.
- नाव न घेता बुचकेंवर टीका
सगळे काही मलाच पाहिजे, पडले तरी मलाच पाहिजे, कितीवेळा पडायचे? जुन्नर तालुक्याला लढणारे वीर पाहिजेत, पडणारे नको अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या आशा बुचके यांच्यावर नाव न घेता केली.