वाल्हे -गणेशोत्सवाची सुरूवात झाली की षीपंचमीचा उत्सव आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी षीच्या संजीवनी समाधी मंदिरात मोठ्या उत्साहात साजारा होत असतो. मात्र, यंदा करोनामुळे मंदिर बंद असल्याने प्रातिनिधीक स्वरुपात ऋषीपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.
ऋषीपंचमीच्या दिवशी ऋर्षींच्या दर्शनाचे महात्म्य खुप आहे. या दिवशी महिलांचे उपवास असतात. ते उजवण्याचा कार्यक्रम, अभिषेक यासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून महिला भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. येणाऱ्या भाविकांची अंघोळीची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने केली जाते. तर काकड आरती, महाअभिषेक, आरती, महर्षिच्या पादुकांची शाही नगरप्रदक्षिणा, प्रवचन, भजन, किर्तन अशा भरगच्च कार्यक्रमाने दरवर्षी षीपंचमीची सांगता होते.
यावेळी प्रसादालाही फार मोठे महत्त्व असते. मात्र, यंदा करोनामुळे हे सगळे कार्यक्रम रद्द करून प्रातिनिधीक स्वरुपात रविवारी (दि. 23) मंदिराचे पुजारी बबन भुजबळ यांनी समाधीला दही, दुधाचा अभिषेक घालून, विधिवत पूजा केली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते वाल्मिकींच्या समाधीस अभिषेक करण्यात आला. यावेळी सूर्यकांत भुजबळ, सतीश सूर्यवंशी, प्रा. संतोष नवले, समदास भुजबळ, सुरेखा भुजबळ उपस्थित होते.