नुकतीच दै. प्रभातमध्ये एक बातमी वाचली “सार्वजनिक स्वच्छतागृह ठरताहेत करोना वाहक’. ही बाब स्वाभाविकच धोकेदायक आहे.कारण सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे हे तेथील नागरिकांना अपरिहार्य आहे आणि त्यामुळे होणारा संसर्गसुद्धा अपरिहार्य आहे. त्यामुळे भविष्यात करोनासारखे संसर्गजन्य साथीचे रोग होतील त्यावेळी हीच समस्या भेडसावेल.
करोनामुळे अनेक नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा यापुढे शासनाने व नागरिकांनी अतिशय गंभीरपणे व वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून समाजाचा साकल्याने विचार करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणे ही आजार पसरवण्याचे केंद्र होऊ पाहतायंत त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि तत्सम गोष्टी यांचा कमीत कमी वापर कसा होईल आणि त्यांचे जास्तीत जास्त उच्चाटन कसे होईल हे पाहणे आता आवश्यक बनले आहे.
एक सूचना करावीशी वाटते की, झोपडपट्टी निर्मूलन आणि दुसरे म्हणजे कोणत्याही प्रकारची साइड मार्जिन न सोडता ज्या प्रकारची घरे बांधली जातात त्यावर कडक निर्बंध लादणे गरजेचे आहे.
-नरेंद्र पानसरे