मुंबई – झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका महाराष्ट्रातील घराघरांत पहिली जाती. या मालिकेत बऱ्याच घडामोडी होतच असतात. मालिकेमध्ये अनेक रहस्यमय घटना समोर येत असतात.
त्यामुळे ही मालिका पाहण्याची प्रेक्षकांना अधिकच उत्सुकता वाढते. पहिल्या दोन भागांना चाहत्यांकडून कमालीची लोकप्रियता मिळाली होती. मात्र तिसरा सिझन सुरु झाला आणि अल्पावधीत करोनामुळे चित्रिकरणालाच ब्रेक लागला.
View this post on Instagram
मात्र, आता आजपासून म्हणजेच 16 ऑगष्टपासून ‘रात्रीस खेळ चाले 3’ ही मालिका पुन्हा झी मराठीवर रुजू होत आहे. 16 ऑगस्टपासून नव्या वेळेनुसार सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे.
View this post on Instagram
नुकतंच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला असून, यामध्ये अण्णा नाईक आणि शेवंता दिसून येत आहे. तसेच “याच संसाराच्या स्वप्नामुळेच तर आज ही पाळी आली पण आता नव्याने सुरु होणार तोच रात्रीचा जीवघेणा खेळ…” अशी टॅगलाईन देखील देण्यात आली.
‘अण्णा नाईक’, ‘माई’, ‘शेवंता’, ‘पांडू’ या आपल्या आवडत्या पात्रांची प्रेक्षक वाट बघत आहेत. गेल्याच आठवड्यात पांडूची भूमिका साकारणारा अभिनेता आणि मालिकेचा लेखक प्रल्हाद कुडतरकर याने ‘रात्रीस खेळ चाले 3’ लवकरच सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा पासून प्रेक्षक ‘रात्रीस खेळ चाले 3’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.