Ranji Trophy 2024 Quarter Final Fixtures : रणजी करंडक 2024 #RanjiTrophy ही सर्वात प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धा सध्या भारतात खेळवली जात आहे. यंदाच्या मोसमात ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत.
5 जानेवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 38 संघांपैकी 30 संघ बाद झाले आहेत. आता अंतिम आठ संघांमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीपूर्वी बीसीसीआयने त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर….
रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. यावेळी या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात कर्नाटक, मुंबई, बडोदा, तामिळनाडू, सौराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशचे संघ यशस्वी ठरले आहेत.
उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना विदर्भ आणि कर्नाटक यांच्यात होणार आहे. दुसरा उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि बडोदा यांच्यात होणार आहे. याशिवाय तिसरा उपांत्यपूर्व सामना तामिळनाडू आणि सौराष्ट्र यांच्यात तर चौथा उपांत्यपूर्व सामना मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्यात होणार आहे.
Presenting the Quarter-finalists of the @IDFCFIRSTBank #RanjiTrophy 🙌
Which team are you rooting for 🤔
🗓️ 23rd to 27th February
📺 @JioCinema
💻📱 https://t.co/pQRlXkCguc pic.twitter.com/0tByOrXvFz— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 19, 2024
या 8 संघांमध्ये रंगणार लढत…
विदर्भ विरुद्ध कर्नाटक, सिव्हिल लाईन्स स्टेडियम (नागपूर)
मुंबई विरुद्ध बडोदा, बीकेसी मैदान (मुंबई)
तामिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र, श्री रामकृष्ण कॉलेज (कोइम्बतूर)
मध्य प्रदेश विरुद्ध आंध्र प्रदेश, होळकर स्टेडियम (इंदूर)
Team India : राहुलसाठीच इशानवर अन्याय; बीसीसीआयच्या सुत्रांनीच दिली धक्कादायक माहिती…
10 मार्चपासून सुरू होणार विजेतेपदाची लढत…
रणजी ट्रॉफी 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान खेळवले जाणार आहेत. यानंतर 2 मार्चपासून उपांत्य फेरीची लढत सुरू होईल. उपांत्य फेरीत पात्र ठरलेले दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. त्यांच्यामध्ये 10 मार्चपासून विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. यावेळी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या सर्व संघांनी अप्रतिम कामगिरी केली. अशा परिस्थितीत यावेळी कोणता संघ रणजी करंडक विजेतेपद पटकावणार हे सांगणे फार कठीण आहे.