पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात समाविष्ट असलेले केंद्रीयमंत्री रामदास आठवले आगामी महापालिका निवडणुकीसाठी सक्रिय झाल्याचं चित्र आहे. पुण्यात त्यांनी मंगळवारी अनेक मुद्दांवर भाष्य केलं. आता त्यांनी भाजपसोबत आरपीआयच्या युतीचं कारण सांगितलं.
रामदास आठवले म्हणाले, “नगरसेवक, उपमहापौर म्हणून सुनीता वाडेकर चांगले काम करत आहेत. गेल्या पाच वर्षात ‘रिपाइं’च्या तिघांना उपमहापौर होण्याची संधी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. भाजप हा संविधानाला मानणारा, दलितांचे प्रश्न सोडवणारा पक्ष आहे.
आठवले पुढं म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानासमोर नतमस्तक होतात. त्यामुळे ‘रिपाइं’ भाजपसोबत आहे. येणाऱ्या निवडणुकीतही पुण्याची महापालिका भाजप-रिपाइंच्या युतीच्या हाती यावी, यासाठी सर्व समाजातील लोकांना एकत्र आणून पक्ष संघटन मजबूत करावे.