दुबई – भारत व पाकिस्तान यांच्यात होणारा टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत कोणत्याही परिस्थितीत रद्द होऊ शकत नाही, असा खुलासा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केला आहे.
आयसीसीच्या करारामुळे बीसीसीआय हा सामना रद्द करू शकत नाही तसेच खेळण्यास नकारही देऊ शकत नाही, असेही शुक्ला यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटना वेदनादायी आहेत. आम्हीही त्याचा निषेध करतो. आयसीसीच्या करारांतर्गत आम्ही कोणत्याही देशासोबत खेळण्यास नकार देऊ शकत नाही. आयसीसी स्पर्धा खेळाव्याच लागतील, असे शुक्ला यांनी म्हटले आहे.