मुंबई : प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचे म्हणत त्याला समर्थन देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अख्तर यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून त्यांना आव्हान दिले आहे.
#संघ तथा #विश्वहिंदूपरिषद के करोडों कार्यकर्ताओ की, जब तक हाथ जोड़कर #जावेदअख्तर माफी नही मांगते. तब तक उनकी तथा उनके परिवार की कोई भी #फिल्म इस #माभारती के भूमि पर नहीं चलेगी. pic.twitter.com/ahWgVQWuvH
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) September 4, 2021
यातच राम कदम यांनी जावेद अख्तर यांंच्यावर टीका साधला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, ‘जावेद अख्तर यांचं हे वक्तव्य लाजीरवाणं आहे. त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिदू परिषदेचे देशभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारं असून अपमानजनक आहे.’ ते पुढे म्हणाले,’ जोपर्यंत जावेद अख्तर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्याचे आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे सिनेमा देशात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देखील राम कदम यांनी दिलाय.