मुंबई – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण हिंदुत्व आणि मशिदींवरील भोंग्यांवरून चांगलच ढवळून निघत आहे. त्यातच आता एमआयएमने एन्ट्री घेतली आहे. एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद येथील खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक झाले. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणात तापणार असं चित्र दिसत आहे. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात भाजपाकडून ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यात येत असताना आता या मुद्द्यावरून राम कदम यांनी ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज दिलं आहे.
‘महाराष्ट्र सरकारमध्ये हिम्मत आणी साहसअसेल तर… ओवैसी वर राजद्रोह गुन्हा दाखल करा..’असं म्हणत कदम यांनी ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज दिलं आहे.
राम कदम यांचे ट्विट
#महाराष्ट्रसरकार मध्ये हिम्मत आणी साहस असेल तर… #ओवैसी वर #राजद्रोह गुन्हा दाखल करा..
— Ram Kadam (@ramkadam) May 13, 2022