Raj Thackeray : राम मंदिर आणि बाबरी मशीद हा वाद देशात तब्बल तीन दशकं सुरु होता. या संपूर्ण घटनाक्रमात मैलाचा दगड आणि हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला तो म्हणजे बाबरी मशीद पाडली गेली तो क्षण. 6 डिसेंबर 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्याचे प्रतिसाद सर्व देशभरात उमटताना पाहायला मिळाले.
दरम्यान, बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते. त्यावेळी त्यांनी पाडलेल्या मशिदीची दोन वीट आपल्या सोबत आणली होती. 32 वर्ष त्यांनी ती वीट जपून ठेवली आहे.
मंदिर बांधून झाल्यावर ती वीट हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा प्रण त्यांनी केला होता. राम मंदिर बांधून झाले पण आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. त्यामुळे त्यांनी ही वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेट दिली.
मात्र, आज राज ठाकरेंनी ही वीट पुण्यात आणली आहे. राज ठाकरे आज पुण्यात आले असताना त्यांनी आपल्या सोबत बाबरी मशीद पाडल्यानंतर तिची वीट आणली. पुण्यातील इतिहास संशोधक मंडळात राज ठाकरे आले. यावेळी त्यांनी शिवकालीन पत्राची पाहणी केली. त्यानंतर इतिहास संशोधक मंडळाला बाबरी मशिदीची ती वीट दिली.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “आम्ही आमच्याकडे महापुरुषांना जातीत पाहतो. त्यावरुन राजकारण केले जाते. हजारो वर्षांचा इतिहास खास करुन महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा इतिहास नक्की वाचला पाहिजे.
हा इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं ? हे शिकायला मिळाला पाहिजे. त्यामुळे तो वाचला पाहिजे. इतिहासावर संशोधन करणारी ही संस्था आहे. या संस्थेसाठी मला काहीतरी कारवासे वाटते. यामुळे आज मी संस्थेला 25 लाख रुपये देत आहे.
बाळा नांदगावकर यांनी आणली ही वीट मी पाहिली. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा ते ही वीट घेवून आले होते. ती वीट मी माझ्या घरात ठेऊन काय करणार? किंवा बाळ नांदगावकर त्यांच्याकडे ठेऊन काय करणार?
आज ती वीट इतिहास संशोधक मंडळाला देण्यासाठी मी आलो आहे. त्या विटेवर संशोधन होणे गरजेचे आहे. ती वीट चांगल्या संस्थेच्या हातात जावी, हा माझा हेतू आहे. त्यासाठी मी आलो आहे. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
वीट स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला….
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘6 डिसेंबरला बाबरीचा ढाचा पडला, त्यावेळी महाराष्ट्रातून जे शिवसैनिक तिथे गेले होते, त्यात बाळा नांदगावकर होते. ढाचा पडल्यानंतर तिथे ज्या वीटा होत्या, त्यातल्या दोन वीटा बाळा नांदगावकर घेऊन आले होते.
एक वीट त्यांच्याकडे आहे, आज दुसरी वीट त्यांनी भेट म्हणून दिलीय. वीटचे वजन बघून समजेल किती मजबूत आहे. तेव्हाचं कन्स्ट्रक्शन चांगलं होतं कारण तेव्हा कंत्राटं निघत नव्हती. हा बाबरी मशीद पाडली त्याचा पुरावा आहे. राम मंदिराच्या निर्माण कार्यातीलही एक वीट मला आणायची आहे.