Rahul Gandhi – राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आसामात अनेक प्रकारच्या परवान्यांचे अडथळे उभे करण्यात आले असून केवळ रस्त्यावर चालण्यांसाठी एखाद्याला इतक्या परवानग्या घ्याव्या लागणे हा प्रकार लोकशाहीला धरून नाही असा आरोप आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी केला आहे.
बोराह म्हणाले की आम्हाल अनेक प्रकारचे परमीट घेण्याची सक्ती करऱ्यात आली. यात्रा ठरलेल्या मार्गावरूनच गेली पाहिजे असा दंडक लागू केला गेला. जराजरी यात्रा दुसऱ्या मार्गावर गेली तरी गुन्हे दाखल केले जात आहेत. गुरवारी ही यात्रा जोरहाट मधून काही काळ वेगळ्या रस्त्याने गेल्याने यात्रेच्या स्थानिक संयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बोराह म्हणाले की, यात्रेचे मुख्य आयोजक केबी बायजू हे यात्रेच्या मार्गाचे नियोजन करण्यासाठी जबाबदार नाहीत, तरीही त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. रस्त्यांवर चालण्यासाठी किती परवानग्या लागतात? असा सवाल करीन बोराह म्हणाले की ही लोकशाही आहे आणि सर्वांना समान अधिकार आहेत. कोणीही रस्त्यांचा खाजगी मालमत्ता म्हणून वापर करू शकत नाही,” असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया, यांनी आरोप केला सरकारकडून यात्रेत अनावश्यक अडथळे निर्माण करण्याचा डाव आहे.आसामात यात्रेला अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी होत असल्याने मुख्यमंत्री घाबरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधींची आसाम पदयात्रा २५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. ती १७ जिल्ह्यांत ८३३ किमीचा प्रवास करणार आहे.