Rahul Gandhi – Wayanad Constituency। लोकसभा निवडणूकीसाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने जोरदार तयारी करत आहेत. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोण निवडणूकीसाठी उभे राहणार याची चर्चा वाढलीय. त्यातच काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या विषयी नवीन माहिती समोर आलीय. ते यावेळी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
राहुल गांधी यांच्या वायनाड लोकसभा मतदार संघाला सोडून इतर मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सध्या देशात सुरु आहेत. राहुल गांधी वायनाड सोडून ते उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघासह तेलंगाणा किंवा कर्नाटकमधील आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
सीपीआय, आययूएमएलमुळे काँग्रेस अडचणीत Rahul Gandhi – Wayanad Constituency।
इंडियन युनियम मुस्लीम लीगचे (आययूएमएल) केरळमध्ये एकूण दोन खासदार आहेत. मात्र या पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तीन जागांची मागणी केली जात आहे. आययूएमएल या पक्षाला मुस्लीम मते मिळण्याचे प्रमाण अधिक आहे. वायनाड या मतदारसंघात मुस्लिमांचे प्रमाण लक्षणीय आहे. या पक्षाकडून वायनाड या जागेची मागणी केली जातीय. त्यामुळे काँग्रेसवर दबाव आला असून राहुल गांधी हा मतदारसंघ सोडून कर्नाटक किंवा तेलंगाणा येथील एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात.
सीपीआयने उभा केला उमेदवार
कम्यूनिष्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) केरळमध्ये एकूण चार जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये वायनाड या जागेचाही समावेश आहे. राज्यपातळीवर सीपीआय हा पक्ष लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा (एलडीएफ) भाग आहे. तर याच पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीत समावेश आहे. असे असताना सीपीआयने वायनाड या मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केल्यामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे. सीपीआयच्या वरिष्ठ नेत्या अन्नी राजा यांना सीपीआयने वायनाडमधून तिकीट दिले आहे.
राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार? Rahul Gandhi – Wayanad Constituency।
दुसरीकडे राहुल गांधी यावेळी पुन्हा एकदा अमेठीसह तेलंगणा किंवा कर्नाटक या दोन राज्यांतील आणखी एका जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर सहमती झाली आहे. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, या सर्व शक्यता असून राहुल गांधी यांनी मात्र निवडणूक लढवण्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.