नवी दिल्ली : लॉकडाऊन हा कोरोना विषाणूवरचा उपाय नाही. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी प्रभावी चाचण्या करणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. त्यांनी गुरुवारी पत्रकारांसोबत संवाद साधला. सरकारने देशात ३ में पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील रणनीती काय? अधिक चाचण्या करण्यासाठी आपण अधिक विचार करायला हवा. लॉकडाऊननंतर देशात कोरोना रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे आगोदरच उपायोजना करायला पाहिजे असं मत त्यांनीयावेळी मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी बऱ्याच मुद्द्यावर सरकारशी सहमत नाही; परंतु हि वेळ लढ्याची नसून, कोरोना विरुद्ध संघर्ष करण्याची आहे असं मत राहुल गांधी यांनी मांडलं.
कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवता येत नाही, स्थलांतरितांच्या प्रश्नावर केंद्राने रणनीती बनवण्याची गरज आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार देण्याची गरज आहे. लॉकडाऊन लागू करण्यासाठी राज्यांनाही सक्षम केले जावे असं राहुल गांधी म्हणाले. कोरोना विषाणूमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमधील राज्यांच्या लॉकडाऊनबाबत अधिक सविस्तर चर्चा झाली पाहिजे. या विषाणूचा पराभव करण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही. लॉकडाऊनमुळे फक्त काही काळ आपण कोरोनाला रोखू शकतो. लॉकडाउन हटवल्यानंतर, व्हायरस पुन्हा सक्रिय होऊ शकतो.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले कि, देशात कोरोना विषाणूच्या चाचण्या तात्काळ करण्याची गरज आहे. देशात दोन वेगवेगळ्या झोनची निर्मिती करण्याची गरज आहे. हॉटस्पॉट झोन आणि नॉन-हॉटस्पॉट झोन. देशात टेस्टिंग रेट आहे 199 प्रति दशलक्ष इतका आहे, तो पुरेसा नाही. कोरोना विषाणूच्या चाचण्यांचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारकडे असलेल्या संसाधनाचे उपयोग प्रभावीपणे करावा. केंद्र सरकाने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकला अधिक पाठबळ देण्याची गरज आहे. इमारतीत राहणारे आणि झोपडपट्टीत राहणारे यांच्या समस्या वेगळ्या. स्थलांतरितांचे प्रश्न वेगळे. या सगळ्या समस्यांवर लवकर निर्णय घ्यायला हवे. सरकाने प्रत्येक बाबतीत संवेदनशील राहुल तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.
कोरोना विरुद्धच्या लढाईत देशाची सर्व शक्ती राज्य आणि जिल्हा पातळीवर कार्यरत आहे. जिल्हा स्तरावरील प्रभावी यंत्रणेमुळेच वायनमधील कोरोना नियंत्रित करता आला. असा दावा त्यांनी केला. कोरोनामुळे देशात आर्थिक संकट येणार आहे. लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे आहे. पण त्याच बरोबर अर्थव्यवस्था हि रुळावर राहील याचा विचार करायला हवा.लॉकडाऊनमुळे देशात बेरोजगारी निर्माण झाली आहे. जिथे मदत पोहचायला हवी तिथे मदत पोहचत नाही.
कोरोनाचे संकट जास्त काळ चालणार असल्यामुळे आर्थिक नियोजन करायला हवं. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशा गरिबांना देखील ध्यान द्या. गोदामामधील धान्य तात्काळ गरिबांना देऊन टाका अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.