तब्बल 94 लाख तिकिटांचे बुकिंग रद्द
नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊनची मुदत वाढल्याने रेल्वेवर तब्बल 94 लाख तिकिटांचे बुकिंग रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रेल्वेला प्रवाशांना 1 हजार 490 कोटी रूपये इतकी भरभक्कम रक्कम परत करावी लागणार आहे. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने अनेक प्रवासी गाड्यांची सेवा 22 मार्चला स्थगित केली. त्यानंतर तीन दिवसांनी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला.
नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊनची मुदत वाढल्याने रेल्वेवर तब्बल 94 लाख तिकिटांचे बुकिंग रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रेल्वेला प्रवाशांना 1 हजार 490 कोटी रूपये इतकी भरभक्कम रक्कम परत करावी लागणार आहे. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने अनेक प्रवासी गाड्यांची सेवा 22 मार्चला स्थगित केली. त्यानंतर तीन दिवसांनी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला.
त्या कालावधीत रेल्वेसेवा पूर्ण बंद करण्यात आली. त्या कालावधीसाठी 55 लाख तिकिटांचे बुकिंग झाले होते. त्यामुळे रेल्वेला 830 कोटी रूपयांचा महसूल मिळाला. मात्र, ते बुकिंग रद्द झाल्याने रेल्वेला प्रवाशांना परतावा द्यावा लागणार आहे. आता लॉकडाऊनची मुदत आणखी 3 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, 15 एप्रिल ते 3 मे या कालावधीसाठी सुमारे 39 लाख तिकिटांचे बुकिंग झाले. त्यातून रेल्वेकडे 660 कोटी रूपये जमा झाले. आता ती रक्कमही रेल्वेला प्रवाशांना परत करावी लागणार आहे. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना ती रक्कम त्याच पद्धतीने उपलब्ध होईल. तर उर्वरित प्रवाशांना संबंधित आरक्षण केंद्रांवरून 31 जुलैपर्यंत परतावा मिळेल.