नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. कारण त्यांच्या मानहानी संदर्भातील याचिका सुरत सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींना तुर्तास खासदारकी परत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले होते. भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी 2019 मध्ये ही तक्रार दाखल केली होती.
Surat court rejects Congress leader Rahul Gandhi’s plea for stay on conviction in defamation case
— Press Trust of India (@PTI_News) April 20, 2023
2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत सत्र न्यायालयात या संदर्भात अपिल केलं होतं. न्यायालयात केलेल्या अपिलमध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती.
दरम्यान, राहुल गांधी यांनी त्यांची खासदारकी गमावल्यानंतर देशभरातून निदर्शने करण्यात आली होती. सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलन करत या निर्णयाचा निषेध व्यक्त केला होता. त्याच प्रकरणाससंदर्भातील याचिका आज सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे.