नवी दिल्ली – लडाखच्या सीमावर्ती भागात तेथील स्थानिकांना गुरे चरण्याचा पारंपारीक अधिकार चीनच्या आक्रमणामुळे नाहीसा झाला आहे, या विषयी राहुल गांधी यांनी लोकसभेत तहकुबी सुचना दिली आहे.
हा विषय गंभीर आणि तातडीच्या चर्चेचा आहे त्यामुळे तहकुबी सुचनेद्वारे सभागृहात तातडीने चर्चा घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या संबंधात एक समिती नियुक्त केली जावी, त्यात लेहकची ऍपेक्स बॉडी, कारगील डेमोक्रॅटिक अलायन्स यांचे सदस्य यांचा या समितीत समावेश करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान लखीमपुर खिरी प्रकरणातील एसआयटी अहवालावर चर्चा व्हावी या मागणीसाठी कॉंग्रेसचे लोकसभेतील प्रतोद मनिक्कम टागोर यांनीही एक स्वतंत्र तहकुबी दिली आहे. कॉंग्रेसचेच मनिष तिवारी यांनी इलेक्शन कमिशनच्या कार्यात केंद्र सरकारचा हस्तक्षेप या विषयावरील तहकुबी दिली आहे.