नीरा -पुरंदर तालुक्यातील पिंगोरी आणि कांबळवाडी या परिसरात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून आमदार संजय जगताप ही भावूक झाले. खचून जाऊ नका शासनाच्यावतीने मदत केली जाईल, असे आश्वासन आमदार संजय जगताप यांनी दिले.
पिंगोरी आणि कांबळवाडी भागात 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील शेती बंधारे आणि जागोजागी रस्तेही वाहुन गेले आहेत. आमदार संजय जगताप यांनी गुरुवारी (दि. 10) पिंगोरी येथे धाव घेतली. प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
यावेळी पोलीस पाटील राहुल शिंदे,माजी सरपंच विद्या यादव, वसंत शिंदे, दत्ताराजे शिंदे, राजकुमार शिंदे, निलेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी अंकुश बर्डे, अनिल दुर्गाडे, एस. पी. गायकवाड, पी. डी. भंडलकर, एक. एस. चव्हाण, ए. एस. शिंदे, संभाजी गरुड, मंडल अधिकारी लाखे, तलाठी खोमणे उपस्थित होते.
जगताप यांनी अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदार जगताप यांनी चालत जाऊन नुकसानीची पाहणी केली. रस्ते व वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत.