पुणे : रसिकशेठ यांचा जन्मदिन म्हणजे प्रबळ अस्तित्वाची भावना आणि चैतन्य व सामाजिक कार्यपरंपरा पुढे नेण्यासाठी व सतत कार्यरत राहण्यासाठी नेहमी प्रेरित व प्रवृत्त करतात अशी भावना, आरएमडी फउंडेशनद्वारे आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी उपाध्यक्षा शोभाताई आर धारिवाल यांनी व्यक्त केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रसिकलाल धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योग जगतातील मान्यवर, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, वृत्त प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस अधिकारी इत्यादी रक्तदानास स्वईछेने आले होते. यावेळी 561 जणांनी रक्तदान केले.
2014 मध्ये महारक्तदान सोहळ्यात एकाच दिवशी पुणे शहरात 24 हजार रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या होत्या. अशी आठवण फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांनी करून दिली. यावेळी बालन उद्योग समूह तथा ईंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन उपस्थित होते.
रक्तदानाच्या व्यतिरिक्त वैद्यकीय, नर्सिंग, लॅबोरेटरी, फार्मसी क्षेत्रातील शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना, यंदाची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याची व निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे धनादेश संबंधीत महाविद्यालयास लवकरच पाठविण्यात येईल अशी माहिती शोभाताई यांनी दिली.
आजची बिकट आर्थिक परिस्थिती उद्या नक्कीच बदलते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी व आपल्या क्षेत्रात नाव कमवावे असे मार्गदर्शन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. रणजीत जगताप यांनी केले.
यावेळी डॉ. भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूयूट ऑफ फार्मासिटिकल्स सायन्स अँड रिसर्च पुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीसाठी फाउंडेशनचे आभार मानले. तर प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक यांनी किशोर कुमार यांचे गीत गात उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. सर्व रक्तदात्यांचे शोभाताई धारिवाल यांनी आभार मानले.