लासुर्णे – इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोरी, बेलवाडी, थोरातवाडी व कुरवली येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 18) रांगा लावून मतदान झाले. मतदानाचा टक्का वाढल्याने सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. सर्वच गावात सत्ताधाऱ्यांना मतदार राजाच्या रोषाचा सामना करावा लागला.
बोरी येथे 77.18 टक्के, बेलवाडी येथे 83.53 टक्के, थोरातवाडी येथे 93 टक्के तर कुरवली येथे 84 टक्के मतदान झाले. यावर्षी सर्वच गावात अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. मतदानाचा वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यासाठी की विरोधी पॅनल साठी फायद्याचा ठरणार हे मतमोजणी दिवशी मंगळवारी (दि. 20) स्पष्ट होणार आहे.