पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (एनएसएस) सात दिवसांची विशेष हिवाळी शिबीरे आयोजित करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंतची डेडलाइन दिली गेली आहे. अत्यंत नेटके, सर्वव्यापी, अधिक परिणामकारकपणे शिबिरे घ्यावी लागणार आहेत. शिबिरासाठी गावची निवड करताना केवळ राहण्या-खाण्या पिण्याची सोय हाच निकष ठेऊ नका, गावच्या विविधांगी विकासाला प्राधान्य द्या, अशा सचूना विद्यापिठाकडून करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत प्रत्येक महाविद्यालयाकडून दत्तक गाव योजना राबविण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या गावांमध्येच शिबिरे घ्यावी लागणार आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे एक-दीड वर्ष महाविद्यालये बंदच ठेवण्यात आली होती. ऑनलाइन शिक्षण सुरू होते. बहुसंख्य कार्यक्रम, उपक्रमही ऑनलाइनच होत होते. 2022-23 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये सुरळीतपणे सुरू झाली. पहिले सत्रही संपले आहे. आता, “युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास’ या विषयावर एनएसएस शिबिर आयोजित करावी लागणार आहे. बॅनर, टीशर्ट, कार्यक्रम पत्रिकेवरच याच थीमचा उल्लेख करावा लागणार आहे.
विशेष शिबिराच्या नियोजनासाठी कार्यक्रम अधिकाऱ्यांची 10 डिसेंबरला विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या सभागृहात बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला शिबिरीसाठी निवड केलेल्या गावाच्या माहितीसह उपस्थित रहावे लागणार आहे. शिबिराचे प्रस्ताव दाखल करणाऱ्या महाविद्यालयांनाचा त्याचा निधी मिळणार आहे. प्रस्ताव दाखल न करताच शिबिर घेता येणार नाही.
– डॉ. प्रभाकर देसाई, एनएनएस विभाग संचालक, पुणे विद्यापीठ