भोर: भोर तालुक्यातील विसगाव खो-यातील धनावडेवाडी, वरवडी खुर्द, वरवडी बुद्रुक, वरवडी डायमुख, धावडी, बाजारवाडी, हातनोशी, बालवडी, निळकंठ, गोकवडी, पोळवाडी, जेधेवाडी, पळसोशी, उत्रौली,धावडी,नेरे,आंबाडे,कान्हवडी, मानकर वाडी,हातनोशी या परिसरात खरीप हंगामाची तयारी सुरु झाली आहे. उन्हाळी नांगरटने जमीनीला वापसा ( जमीन तापणे)मिळतो. आजही ग्रामीण भागात काही अंशी पारंपरिक पद्धतीने उन्हाळी नांगरट केली जाते. यात लोखंडी नांगराला १२ बैलांना औताला जूपुन नांगरणी केली जाते असे काही वर्षापर्यंत ग्रामीण भागात चित्र पहावयास मिळत होते.
अलीकडे शेतकरी शेतीकामासाठी आता यांत्रिकी साधनांचा वापर करत असल्याने यंत्रसाधनांच्या वापरामुळे पारंपरिक शेती औजारे नामशेष होणार्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्यांनी अत्याधुनिक यंत्रांचा वापर केल्याने फाळनांगर, मोगडा, कोळपे, वखर, नागर, तिफन, लाकडी अवजारे पारंपरिक औजारे व साधने नामशेष झाली आहेत. शेतीच्या मशागतीसाठी व कामासाठी मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांना जाणवत असल्याने. मोठे ट्रॅक्टर, छोटे पॉवर ट्रॅक्टर,हार्वेस्टरसोबतच नवीन येणार्या यंत्राचा शेतकरी उपयोग करू लागला आहे. परिणामी पारंपरिक शेती औजारे व साधने नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
बारा बैली औताने नांगरट केल्याने ६ इंचा पर्यंत नागरणी होते,यामुळे शेतक-याने वापरलेले शेण खत, लेंडी खत, याचा अंश पुढील पिकाकरीता उपयुक्त ठरतो. जमीनीचा पोत,कस यात फरक पडत नाही,जमीनीवरील माती उलट-पलट केल्याने जमीनीचा कस वाढण्यास मदत होते, परंतु टॅक्टरच्या नागरणीने १ फुटा पर्यंत जमीन नांगरली जाते त्यामुळे अलटपालट करताना बिनकसाची जमीन वर येते याचा परिणाम पिकाचे उत्पादन घटते
अभिजीत मरगजे, प्रगतिशील शेतकरी कान्हवडी(ता.खंडाळा)
शेती कामाकरीता मजूर उपलब्ध होत नाही अत्याधुनिक यांत्रिक साधना मुळे वेळेची,श्रमाची बचत होते,तसेच शेतक-या कडील शेती भाव हिस्स्याने दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतक-यांना बैला सांभाळणे परवडत नाही,तसेच बैल सांभाळणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही
त्यामुळे ग्रामीण भागात बैलजोड्या नगण्य स्वरुपात आहेत,
किरण शिवतरे,प्रगतिशील शेतकरी उत्रौली(ता.भोर)