शिक्रापूर : दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारासाठी जर कोणी फक्त दिव्यांगांसाठी कंपनी उभी करत असेल तर त्या कंपनीच्या नोंदणीपासून प्रत्यक्ष काम सुरु होईपर्यंत राज्य शासनाची सर्व प्रकारची मदत मिळवून देणार, असे आश्वासन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील मूकबधीर दिव्यांगांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती आंदोलन आयोजित नोकरी मेळाव्यात ते बोलत होते, याप्रसंगी राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, पिणाकी फाउंडेशनचे संचालक सुनील गुट्टे, बालकल्याण संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे,
युथ फॉर जॉबच्या संचालिका भूमिका कृपलानी, प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे धर्मेंद्र सातव, रामदास खोत, मुक बधिर विभाग प्रमुख महेश शिंदे, दिव्यांग हक्क सुरक्षा समितीचे हरिदास शिंदे उपस्थित होते. बालकल्याण संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे यांनी प्रास्ताविक केले.