वाघाळेतील शेतकऱ्याची व्यथा : वाहतूक खर्च माथी
रांजणगाव गणपती : वाघाळे (ता. शिरुर) येथील एक युवा शेतकरी विशाल बाळासाहेब सोनवणे यांना कांद्याची पट्यी ही फक्त १५१ रुपये आली आहे. सोनवणे यांना लागवडीचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. ३०२ किलो कांद्याचा वाहतूक खर्च निघाला नसल्याने हे शेतकरी हताश झाले आहे.
विशाल बाळासाहेब सोनवणे हा यावर्षी चांगले उत्पन्न होईल या आशेने शेतात कांदे लागवड करतो. मात्र, ज्यावेळी कांदा घेऊन बाजारात विक्रीसाठी बाजारात घेऊन जातो. तेव्हा मोटारभाडे , हमाली, मापाई यांचा खर्च वजा होता होती. काहीच न आल्याने उद्विग्न झालेल्या या युवा शेतक-याने आता शेती करायची का नाही, हे सरकार मायबापानेच आम्हांला सांगावे, अशी प्रतिक्रिया दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
वाघाळे येथील एक युवा शेतकरी विशाल बाळासाहेब सोनवणे यांनी यावर्षी चांगले उत्पन्न होईल या आशेने शेतात कांदे लागवड केली. या कांदा लागवडीसाठी एकरी साठ हजार रुपये खर्च करण्यात आला. मात्र, ज्यावेळी कांदा काढून शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका व्यापा-याला विकला. कांदा विक्रीची पट्टी हातात आली. तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण कांद्याच्या सहा गोण्यांचे वजन ३०२ किलो भरले होते.
कांद्याला बाजारभाव ५० रुपये प्रती १०० किलो असल्यामुळे १५१ रुपये हाती आले होते. मात्र, मोटारभाडे १०४ रुपये, हमाली ३३ रुपये, १४.४ मापाई असा खर्च आल्याने विशाल सोनवणे यांना व्यापा-या समोरुन हात हलवत माघारी यावे लागले आहे.
एंकदरीत आजमितीस शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी शेती कसायची का पडीक ठेवायची असा प्रश्न ऊभा राहिला आहे.