काटेवाडी – महात्मा गांधी जयंतीनिमित्त काटेवाडी येथे स्वच्छता ही सेवा हे अभियान संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने गावामध्ये एक तास स्वच्छता करून राबविण्यात आले.
रविवारी (दि. 1) संपूर्ण भारत देशामध्ये सकाळी 10 ते 11 या वेळेत एक तास स्वच्छतेसाठी हे अभियान स्वच्छता ही सेवा म्हणून राबविण्यात येत आहे. त्यामुळे काटेवाडी येथे सकाळी दहा वाजता स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत गावामध्ये स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच श्रीधर घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष के. टी. जाधव, राजेंद्र पवार, अनिल काटे, महादेव कचरे, संजय शेळके, दत्तात्रय काटे, ऍड. राजेंद्र मासाळ, राजू भिसे, प्रकाश टेंगले, अजित काटे, शीतल काटे, किरण वायसे, मिलिंद काटे, सागर भिसे, धनंजय भिसे, विशाल सुतार, महादेव घुले, लोकेश भिसे, धनंजय काळे, गौरी काटे, रंजना लोखंडे, मीनाक्षी देवकाते, पोलीस पाटील सचिन मोरे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे तसेच गावातील ग्रामस्थ या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते.
अस्वच्छता हे अनेक आजाराचे कारण आहे. त्यामुळे सर्वांनी स्वच्छतेतून समृद्धीकडे हा कानमंत्र डोळ्यासमोर ठेवून काटेवाडी येथे अभियानात सर्व शासकीय संस्था, शाळे मधील विद्यार्थी, बालवाडीमधील शिक्षिका, सर्व गावकर्मचारी, महिला बचत गट, स्वच्छतादूत यांनी या राष्ट्रीय सेवा स्वच्छता अभियानात सहभागी होऊन घर, परिसर, तसेच संपूर्ण गावांमध्ये स्वच्छता.