राजगुरूनगर -दिवाळीनंतर कमी होणारी करोनाबाधितांची संख्या यावर्षी मार्च महिन्यात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. करोना रुग्णसंख्या रोज अर्धशतक पार करीत असताना आज (रविवारी) शतकाच्या उंबरठ्यावर कधी पोहोचली ते कळलेच नाही. योग्य काळजी घेतली नाही तर हीच परिस्थिती आणखी बिकट होईल, असेच चित्र या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे करोनाला नागरिकांनी अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
रविवारी तालुक्यात नव्याने 89 करोनाबाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 11 हजार 601 इतकी झाली आहे. यातील 11036 जण उपचारानंतर बरे झाले असले तरी 206 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सध्या विवधि रुग्णालयांत 359 रुग्ण उपचार घेत आहेत. चाकण, आळंदी, राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत अनुक्रमे 13, 12 व 6 रुग्ण आढळले तर ग्रामीण भागात 58 जण आढळलेत. यात सर्वाधिक महाळुंगेमधील 15 रुग्णांचा समावेश आहे.
त्याखालोखाल गुंडाळवाडीत 12 बाधित आढळले तर मेदनकरवाडी 5, चिंबळी, नाणेकरवाडीत प्रत्येकी 3, कुरुळी, पाईट, होलेवाडी, चऱ्होली खुर्दमध्ये प्रत्येकी 2 आणि दोंदे, कडाचीवाडी, खराबवाडी, येलवाडी, तिन्हेवाडी, वाकी बुद्रुक, मरकळ, रासे, काळूस, वाडा व गुळाणीत प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.