दिगंबर जोगदंड ः कवडीपाट टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन
लोणी काळभोर – मातंग समाजाच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाहीत, तर राज्यातला मातंग समाज एक होऊन राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करून या सरकारला जेरीस आणू, असा इशारा हवेली सकल मातंग समाजाचे युवा नेते दिगंबर जोगदंड यांनी दिला आहे.
मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी समाजाच्या वतीने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कवडीपाट टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दिगंबर जोगदंड बोलता होते. ते म्हणाले मातंग समाजाचे नेते विष्णूभाऊ कसबे यांनी मातंग समाजाची जिव्हाळ्याची मागणी असलेल्या अनुसूचित जातीमध्ये एकत्रित असणार्या आरक्षणाची लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब, क, ड वर्गीकरण करावे व इतर प्रलंबित मागण्यांसाठी पुणे ते नागपूर आरक्षण क्रांती पदयात्रा सुरू केलेली आहे.
ही पदयात्रा दिनांक 13 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे पोहोचणार आहे. तेथे भव्य मोर्चा होणार आहे. मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोणी काळभोर येथील कवडीपाट टोलनाका येथे सकल मातंग समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिवाळी अधिवेशनात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा सरकारला देण्यात आला. त्यामुळे निर्माण होणार्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल.
यावेळी आनंद वैराट, दिगंबर जोगदंड, विजय सकट, नितीन लोखंडे, आकाश मात्रे, संजय भालेराव, सहदेव खंडागळे, राहुल ढेले, राजाभाऊ आढागळे, अमोल लोंढे, दिपक मात्रे, सचिन शेलार, विशाल लोणारे, राकेश लोंढे, अनिल कांबळे, किशोर शिंदे, रोहित शेलार, अशोक मात्रे, सागर मात्रे, विजय रणदिवे, विशाल बोराडे, भीमराव सकट, संतोष आढागळे, कृष्णा मात्रे, विक्रम बोराडे, गुरु भोसले, ओंकार जाधव, गणेश भिसे, बबन मात्रे, सुजल शेंडगे, जय मात्रे व हवेली तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.