सासवड -केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला राजकीय हेतुने महाराष्ट्र सरकारने स्थगिती दिली आहे. याचा निषेध करून हे विधेयक राज्यात लागु करावे, या मागणीसाठी देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे व तालुका अध्यक्ष आर. एन. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका भाजपा वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन केले.
तहसीलदारांच्या वतीने नायाब तहसीलदार सूर्यकांत पठाडे यांनी स्वीकारले. यावेळी तालुका कार्याध्यक्ष निलेश जगताप, संघटन सरचिटणीस श्रीकांत थिटे, महीला अध्यक्ष मैनाताई जाधव, सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप, जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे, कैलास जगताप, तुजा जाधव, संकल्प वळकुंदे, काका निगडे, प्रसाद अत्रे, प्रकाश भामे, नदीम इनामदार, सरलाताई तिवारी, ऍड. अशोक भोसले, ऍड. विश्वास पानसे, नागनाथ झगडे, विजय जगताप, राजु गायकवाड, गणेश भोसले, अमोल जगताप, जालिंदर टेकवडे, सोमनाथ राणे उपस्थित होते.