केंद्राची निर्यातबंदी शेतकऱ्यांच्या मुळावर : उत्पादनखर्च मातीमोल
रांजणगाव गणपती – दोन ते तीन महिन्यांपूर्वी टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ही चांदी होईल, पैसा गाठीला मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली.
मात्र, केंद्र सरकारची धोरणे बदलल्याने टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. पिंपरी दुमाला येथील शेतकऱ्यांना टोमॅटो अक्षरशः जनावरे सोडण्याची वेळ आली आहे.
पिंपरी दुमाला येथील प्रगतशील शेतकरी कैलास खेडकर यांनी दीड एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली होती. साधारणपणे दीड लाख रुपये एकरी खर्च आला होता.
परंतु बाजार नसल्यामुळे टोमॅटोच्या शिवारात अक्षरशः जनावरे सोडायला लागली आहेत. तोडणीचा खर्चही निघत नाही. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.