पुणे – खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात दोन महिण्यापासून फरार असलेल्या कुख्यात गावगुंडांस शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात तब्बल 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट आणि खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी रंणजीत विलास परदेशी, श्रीनाथ उर्फ शेरू विलास परदेशी आणि चिराग महेश जोशी हे फरार होते. ते सोमवार शिवाजीनगर परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर पथकासह त्यांच्यामागावर गेले. आरोपी हे मेट्रो गेट, कामगार पुतळ्या जवळ याठिकाणी मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे.
आरोपींवर खून, खूनाचा प्रयत्न, फसवणूक, आर्म ऍक्ट असे गंभीर गुन्हे डेक्कन, स्वारगेट, भोसरी, शिवाजीनगर, बंडगार्डन, सहकारनगर आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, पोलीस अंमलदार गुंड, राजपूत, फडतरे, साठे, भिवरे, मेमाणे, राऊत, होळकर यांनी केली यांच्या पथकाने केल्याची मोहिती उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी दिली.