पुणे – इतर जिल्ह्यांतून पुणे जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना 48 तास अगोदरचा करोना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे. ग्रामीण भागात करोनाचा वाढलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागात करोना बाधितांचा दर अजूनही कायम आहे. त्यामुळे 15 जूनपर्यंत पूर्वीचे निर्बंध लागू आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी आदेश दिले आहेत. माल वाहतूक वाहनातून चालक आणि मदतनिसांनाच प्रवास करण्यास परवानगी आहे.
मात्र, ते वाहन जर इतर राज्यांतून पुणे जिल्ह्यात येणार असेल तर त्यांना आरटी-पीसीआर अहवाल बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच दूध संकलन, दूध वाहतूक सुरू राहणार आहेत. त्यामुळे हा अहवाल आवश्यक आहे.