पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या चार ही धरणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या. 12 तासात पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात सोमवार सकाळ ते मंगळवार सकाळपर्यंत खडकवासला धरण भरल्याने धरणातून 2568 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खडकवासला -६० मिमी,पानशेत – १४१ मिमी, वरसगाव -१३७ मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात १७० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १०.७९ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी पेक्षा हा पाणीसाठा जवळपास २ टीएमसी जास्त आहे.
पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात मागील चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे.यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या पानशेत, टेमघर,वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणामधील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. यामुळे पुणेकर नागरिकांची पाणी संकटातून सुटका झाल्याचे म्हणावे लागेल.