नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आंदोलन उभारलेल्या भारताच्या कुस्तीपटूंनी रविवारी(दि.28) नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्यावेळीच महापंचायत आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. गेले जवळपास एक महिना हे कुस्तीपटू आंदोलनाला बसले असून त्यांची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळेच या महिला कुस्तीपटूंसह पुरुष कुस्तीपटूंनीही देशवासियांना या लढ्यात सहभागी होण्याचे व पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे.
ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून त्यांच्या विरोधात दोन खटलेही दाखल करण्यात आले आहेत. मात्र, जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे ठाम मत विनेश व बबिता फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया आंनी व्यक्त केले आहे. त्यातच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचय हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. याच संसद भवनाच्या बाहेर हे कुस्तीपटू महिला कुत्सीपटूंसह महिलांची महापंचायत भरवणार आहेत. त्याला खाप पंचायतीनेही पाठिबा दिला आहे.
गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे – कमल हसन
ज्या खेळाडूंनी देशाला पदके मिळवून देण्यासाठी लढा दिला पाहीजे त्यांना स्वतःवर झालेल्या अन्यायाविरोधात गेले महिनाभर लढा द्यावा लागत आहे. आपण कतोणाला पाठिंबा देणार, खेळाडूंना की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय व्यक्तींना. देशासाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे की खेळाडूंकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही.
काय होऊ शकते
कुस्तीपटूंना नव्या संससद भवन परिसरात येण्यापासून रोखले जाऊ शकते. तसेच त्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस बळाचा वापरही केला जाऊ शकतो तसेच या खेळाडूंना सुरक्षेचा मुद्दा पुढे करत अटकही केली जाऊ शकते.
केवळ जबाब नोंदवला पुढे काय
केंद्रिय क्रीडा मंत्रालय तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटना यांनी या कुस्तीपटूंच्या प्रकरणी जबाब नोंदवून घेण्यासाठी एक समिती नियुक्ती केली होती. त्यांनी प्रत्येक खेळाडूला वेगवेगळे बोलावून त्यांचा जबाबही नोंदवून घेतला मात्र, त्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. आता काय होणार व कारवाई कधी होणार असा प्रश्नही विनेश फोगटने विचारला आहे.