पुणे – पुणेकरांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. सुरक्षितेबरोबरच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील विविध भागांत येत्या काही दिवसांत 1500 सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. आयुक्तालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
पुणेकरांना सुरक्षितपणे घराबाहेर पडता यावे यासाठी नवीन योजना कार्यान्वित होणार आहेत. विविध रस्त्यांसह प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
मात्र, त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था भक्कम होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी लावलेल्या नादुरुस्त कॅमेऱ्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.