Prime Minister On Sharad Pawar । देशातील लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा ७ मी रोजी पार पडणार आहे. त्यासाठी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. काल दिवसभरात ३ सभा घेतल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरस याठिकाणी सभा घेत आहेत. याठिकाणी महायुतीचे उमेदवार रणजितसिंग निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरसमध्ये प्रचार सभा सुरु आहे.
राज्यात मोदींच्या सभांचा धडाका सुरु आहे. त्यात आज माळशिरसमध्ये पंतप्रधानांची सभा पार पडत आहे. आजही पंतप्रधानांनी आपल्या भाषांची सुरुवात मराठीतून केली. यावेळी त्यांनी येळकोट येळकोट….चा जयघोष केला. त्यासोबतच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचाही जयघोष केला. तसेच विठोबा -रखुमाईच्या चरणी नतमस्तक होतो असे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, आजच्या सभेतही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.
दरम्यान, सभेला जमलेल्या गर्दीला पाहून त्यांनी,”सभेसाठी मी प्रत्येक सभेत वेळेत पोहचतो नेत्यांना उशिरा येण्याची सवय आहे. त्यामुळे गावागावातून आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो तर जे लोक उशिरा येणार आहेत त्यांची माफी मागतो असे त्यांनी म्हटले. अनेक संतांचे आम्हाला आशीर्वाद मिळाले आहेत. जनतेचे प्रेम मोठी ताकद असून माझ्या शरीराचा कण कण जीवनाचा क्षण क्षण देशाला समर्पित असल्याचेही त्यांनी म्हटले.
काँग्रेसवर टीका Prime Minister On Sharad Pawar ।
सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यांनी यावेळी काँग्रेसने मागच्या ६० वर्षात देशाच्या विकासासाठी कोणतेही काम केले नाही. तसेच मागच्या ६० वर्षात काँग्रेसचे नेते गरिबी हटाव चा नाराच देत बसले पण आम्ही २५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढलं” असा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला. तसेच काँग्रेसने ६० वर्षात जेवढा खर्च केला तेवढा आम्ही १० वर्षात केला. त्याच खर्चातून आम्ही रस्ते आणि रेल्वे तसेच जनतेच्या सुविधा निर्माण करत आहोत असेही त्यांनी म्हटले.
त्या नेत्याची इथून निवडणूक लढण्याची हिम्मत नाही Prime Minister On Sharad Pawar ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील पाणी प्रश्नावर बोलताना शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मागच्या अनेक वर्षापसून राज्यातील एका नेत्याने जनतेला पाण्याचे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन आजपर्यंत पूर्ण केले नसल्याचे म्हटले. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेला थेंब थेंबा साठी तडपवण्याचे काम काँग्रेसने केले. असा आरोप त्यांनी केला. म्हणूनच त्या नेत्याची इथून निवडणूक लढण्याची हिम्मत नाही असा टोला देखील मोदींनी लगावला.