नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’चा हा पाचवा कार्यक्रम असेल. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या सुमारे एक हजार मुलांना संबोधित करणार आहेत. सकाळी 11 वाजता कार्यक्रम सुरू होईल. करोनामुळे गेल्या वर्षी हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला होता. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे.
‘परीक्षा पे चर्चा’चा हा पाचवा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमामध्ये इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे 1 हजार विद्यार्थी सहभागी होतील. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील सरकारी आणि खाजगी शाळांमधील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.
यावेळी भारताचे सर्व राज्यपाल राजभवनात विद्यार्थी आणि शिक्षक ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. केंद्रीय उच्च शैक्षणिक संस्थांमध्येही हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाला 2018 साली सुरुवात झाली. बोर्डाच्या परीक्षेआधी पंतप्रधान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना तणावमुक्त करण्याबाबत चर्चा करतात.