Prakash Ambedkar । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष मैदानात उतरला असल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इतर पक्षाचे नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत पक्ष सोडून भाजप , शिंदे गट , अजित पवार गटात सामील होत आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांकडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार करायला सुरुवात झाली आहे.
अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा करत आहपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०२४ मध्ये २०१४ आणि २०१९ पेक्षाही मोठी लाट असेल आणि भारतीय जनता पार्टीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
यावर आता विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. भाजप ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दाव्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘भाजपाने फक्त १५० जागा जिंकून दाखवाव्यात. निवडणुकीच्या मैदानात त्यांनी १५० जागा जिंकल्या तरी फार मोठी गोष्ट आहे, असे मी मानतो. भाजपाला चुकीची माहिती मिळत आहे. पक्ष फोडून आम्ही ४०० पेक्षा अधिक जागा जिंकू असे त्यांना वाटत आहे. ते पक्ष फोडू शकतील, नेते विकत घेऊ शकतील. मात्र ते मतदारांना विकत घेऊ शकणार नाहीत. मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Prakash Ambedkar । वंचितने माविआ बैठकीत नेमकी काय मागणी केली होती ?
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सोबत येण्याबाबत वंचितने महाविकास आघाडीच्या बैठकीत चार प्रमुख प्रस्ताव ठेवले होते. त्यातील एक प्रस्ताव जालना आणि पुण्यातील लोकसभेच्या लागेबाबत होता. जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ.अभिजित वैद्य यांना कॉमन कॅण्डीडेट म्हणून जाहीर करावे अशी मागणी या एका प्रस्तावातून वंचितने केली होती.