मुंबई – आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्राजक्ता सोशलवर देखील प्रचंड सक्रिय असते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने लग्नासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे तिला अनेकांनी उलट-सुलट प्रश्न देखील विचारले होते.
गेल्या महिन्यात प्राजक्ताने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात हजेरी लावली होती. आश्रमात प्राजक्ताला थेट श्री श्री रविशंकर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी प्राजक्ताने रवी शंकर यांना लग्नाबाबत एक प्रश्न विचारला होता. “जीवनामध्ये विवाह करण्याची गरज आहे ?’ असा थेट सवाल प्राजक्ता माळीने यावेळी श्री श्री रविशंकर यांना विचारला.
यावर रविशंकर म्हणाले, “तू मला विचारत आहेत, असं असत तर कधीच माझ्याबाजूला अजून एक खुर्ची लागली असती” असं मिश्किल भाष्य केलं आहे. तसेच ते पुढे म्हणाले, तुम्ही खुश राहणं गरजेचं आहे. तुम्ही लग्न करून खुश रहा किंवा न करता खुश रहा .. परंतु आंनदी राहणं गरजेचं आहे’. असं स्पष्ट मत यावेळी श्री श्री रवीशंकर यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, आता पुन्हा एकदा लग्नच्याच प्रश्नावरून प्राजक्ता माळी प्रकाशझोतात आली आहे. यावेळी तिने थेट बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच, अभिनेता सलमान खान याच्याशी लग्नगाठ बांधायची होती असं वक्तव्य केलं आहे. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने याबद्दल खुलासा केला आहे.
या मुलाखतीमध्ये प्राजक्ताला तिच्या पहिल्या सेलिब्रिटी क्रशविषयी विचारण्यात आले होते. याचा खुलासा करताना ती म्हणाली, “मला सलमान खान आवडायचा. मी अगदीच लहान होते…दोन-तीन वर्षांची. माझ्या आतेभावाचा तो खूप आवडता हिरो होता. त्याने मला शिकवलं होतं आणि मी म्हणायचे की मला सलमान खानची लग्न करायचं’. हे उत्तर देताना प्राजक्तालाही ते जुने दिवस आठवून हसू आलं.