– मिलन म्हेत्रे
समाजातील चांगल्या बदलाचा स्वीकार करणारे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच असतील… बोलणे, ऐकणे, पाहणे आणि कृतीत आणणे यामध्ये खूप अंतर असते आणि ते पार करायलाच काही काळ जातो, त्यासाठी धाडसही लागते. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने उचललेले एक सकारात्मक पाऊल…!
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर आदर्श जोडपे ठरले आहे. सिद्धार्थने त्याची आई अभिनेत्री सीमा चांदेकर यांचे दुसरे लग्न लावले असून, या दोघांनीही आईला या वयात जोडीदाराची आणि साथीची किती गरज आहे, हे ओळखून खुल्या विचारसरणीने आणि आईच्या म्हणजेच एका स्त्रीच्या भावना समजून या लग्नासाठी पुढाकार घेतला आहे.
नवरा गेल्यावर सती जाणाऱ्या स्त्रियांच्या यातना स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकांनी पाहिल्या, जाणल्या आहेत; पण त्याविरोधात पाऊल उचलण्याचे धाडस राजा राममोहन राय यांनी दाखवले आणि सतीची चाल बंद झाली. स्त्रीचे एकटेपण ही गोष्ट नेहमीच चर्चेची बाब ठरली आहे. “तिला काय करायचे आता…’ हीच विचारधारा “तिच्या’बाबतीत ऐकायला मिळते.
समाजाचे दोन चेहरे असतात… एक नुसतेच शहाणपण शिकवणारे आणि दुसरा बदल स्वीकारणारे…. सिद्धार्थ या दुसऱ्या चेहऱ्याचा आहे…. सवाष्ण म्हणजे कुंकू आणि मंगळसूत्र, नवरा गेला की हे सगळे संपले. मात्र, आजही कुमारी.. विधवा.. परित्यक्ता… आणि घटस्फोटित महिलांना त्यांच्या स्त्री असलेल्या अस्तित्वापासून दूर ठेवणाऱ्या महिलांसाठी हे उदाहरण एक चपराक आहे….
सिद्धार्थच्या या निर्णयाचे कौतुक नक्कीच आहे… पण त्याचा स्वीकार प्रवृत्तीची दाखल ीे लरश्रश्रशव समाजाने घ्यायला हवी आहे… मन “स्त्री’ला ही आहे… ते दमन करण्यासाठी नाही… स्वैराचारासाठी तर नाहीच नाही; पण ते जाणणारा समाज आजही मागासलेला आहे, हे वास्तव आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्यांना हे लग्न कदाचित रुचणार नाही; पण साथीदाराची साथ जाणणारे याचे नक्कीच स्वागत करतील.