पुणे – परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला. चव्हाण यांनी अण्णाभाऊ साठे महान प्रतिभेचे साहित्यिक होते, असा गौरव करून म्हटले की त्यांची फकिरा कादंबरी प्रत्येक मराठी माणसाने वाचावी अशी आहे. आपल्या देशातील कर्तृत्ववान माणसांचे कार्य समाजापर्यंत पोहोचावे. अण्णा भाऊंच्या काही पुस्तकांचे रशियन, जर्मन भाषांत अनुवाद झाले आहे.
राष्ट्रीय पक्षाची उभारणी अशक्य
कोईमतूर – तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनी असे सांगितले की, कॉंग्रेसच्या विरोधात कम्युनिस्टेतर पक्षांचा राष्ट्रीय पक्ष बनविणे सोपे नाही.
दारिद्य्र नष्ट करण्याची किमया विज्ञान करील
हैद्राबाद – देशातील दारिद्य्र नष्ट करण्याची किमया विज्ञान करू शकेल, असे विचार डॉ. ग. स. महाजनी यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्योत्तर काळात देशात राजकीय प्रश्नापेक्षा आर्थिक प्रश्न मोठे आहेत व त्यातून बाहेर पडण्यासाठी देश प्रयत्न करीत आहे. देवीसारख्या साथीच्या रोगाचे निर्मूलन प्रार्थना व पूजा करून होणार नाही. विज्ञानामुळेच निर्मूलन होऊ शकते. साक्षरता प्रसार आणि विज्ञान प्रसार यासाठी शिक्षकांनी असे वर्ग घ्यावेत.
कुर्नूल जिल्ह्यातील चित्रपटगृहे बंद
कुर्नूल – आपल्यावर लादलेल्या अन्याय्य दंडाचा निषेध करण्यासाठी कुर्नूल जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 90 थिएटरचालकांनी चित्रटगृहे बंद ठेवली आहेत.